त्याने कोणालाच सोडले नाही...नेहरू...इंदिराजी...
यशवंतराव, पवार, ठाकरे...आज इतक्या खिलाडू पणे, निर्भीड पणे, अलिप्त पणे...
थोडक्यात यतार्थ भाष्य साधणारा कोणीही नाही...त्याचे कार्टून बघितले...
कि वर्तमान पत्र वाचावे लागायचे नाही...
आज पुरे वर्तमान पत्रे वाचली तरी समाधान नाही...
तो खर्या अर्थाने कॉमन माणसाचा आवाज होता...स्ट्रेस बस्टर जणू !
आजकाल तर त्याच्या साठी खूपच खाद्य आहे...
काही काही म्हणू नका !
मला माहित आहे पूर्वी त्याच्या साठी टाइम्स मध्ये राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय
बातम्या वाचायला माणसे ठेवली होती...
ते सर्व जण मोठ्याने बातम्या वाचायचे
आणि हा सुचेल तशी ३, ४ कार्टून काढून निघून जायचा...
त्यामुळे त्यावेळी गोसीप, पेज ३ वैगैरेची गरज भासायची नाही...
अखे वर्तमान पत्र जणू...याच्या मुळेच चालायचे...
अशी माणसे पुन्हा होणे नाही...
आणि गमत म्हणजे...
याला आर्ट्स स्कूल मध्ये प्रवेश नाकारला होता ...
आत्ता बोला !
आपला अमर ,
No comments:
Post a Comment