कुणीही कस दीसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. तेशक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
पाण्यात राहायचे तर माशंशी नुसती मैत्री करून भागत नाही तरस्वताला मासा बनावे लागते.
वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुनरहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगगनेनिघून जातात. वादळ महत्वाचे नसते , प्रश्ना असतो आपणत्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्या अवस्थेतबाहेर येतो याचा असतो.
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....पण गगनभरारीचंवेड रक्तातच असावं लागतं...कारण आकाशाची ओढ दत्तक घेतायेत नाही.
आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हागुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळासंघर्ष असतो.त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवासआपोआप होतो.
समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो.पण एकदाअपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या तीउंचीच सोडवते.
संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्यानेदिवस जिंकला.'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाचजास्त घाबरतो.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतातआणि झऱ्यावर राजहंस !
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठीनवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबूनअसतो.
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंतीकळते.
औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणिआत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
अत्यंत महागडी, न परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानीभरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोबनसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणेही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूकभागवणे ही संस्कृती !
(जाला वरून साभार)