ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना !
एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंततोडून
उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसापोकळी असते.
तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडलीआहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय चिणला गेला आहे. त्याला त्यापालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास५ वर्षांपूर्वी हे घर नवीन बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत हीपाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत हालचालन करता ती पाल जिवंत कशी रहिली? जे जवळजवळ अशक्य होतं.
त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष थेवून बसला, की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की तेथे दुसरी पालही आली आहे आणितिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हेपाहून तो माणूस अवाक झाला,गहिवरला. कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एकपाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून न देता !
एक पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची अशा प्रकारेकाळजी घेतो, तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो. तेंव्हा, अडचणीतअसलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या. जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरजअसते,तेंव्हा. "तुम्ही" म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता. कोणतीही गोष्ट (नातं,विश्वास...) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं , परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणालालावावं लागतं
No comments:
Post a Comment